नवी दिल्ली : सध्या देशभरात करोना विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. एका दिवसाला देशात करोनाचे दीड लाखांहून अधिक बाधित रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर देशपातळीवर लॉकडाऊन होण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, यासंदर्भात केलेल्या ट्विटमुळे, आता यामध्ये अधिक स्पष्टता आली आहे. ‘देशात करोनाच्या संसर्गाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत असली, तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची कुठलीही योजना नाही आहे. आम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे.’ असे ट्विट त्यांनी ट्विट केले आहे.
Finance Minister Smt. @nsitharaman shared the measures being taken by India to contain the spread of second wave of pandemic including the five pillared strategy of test-track-treat-vaccination and #COVID19 appropriate behaviour. (3/5) pic.twitter.com/2osJ2jvygh
— Ministry of Finance (@FinMinIndia) April 13, 2021
त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश लॉक होणार नाही. तर कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली जातील. कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना वेगळे ठेवण्याबाबत उपाय केले जातील. स्थानिक पातळीवरील उपायांमधून संकटाचा सामना केला जाईल. मात्र लॉकडाऊन लावले जाणार नाही.
त्यामुळे गतवर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश बंद होणार नाही, तर केवळ करोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रणासाठी, स्थानिक पातळीवर विशेष पावले उचलली जातील. स्थानिक पातळीवरील उपायांमधून संकटाचा सामना केला जाईल. मात्र लॉकडाऊन लावले जाणार नाही, असे सूचक संकेत त्यांनी दिले आहेत.
अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट केले आहेत, ज्यात करोना विषाणूच्या फैलावाला रोखण्यासाठी, ‘पाच सुत्री रणनीती’ तपासणी, माहिती घेणे, उपचार करणे, लसीकरण आणि कोविड-१९ पसरण्यापासून रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या माहितीचे विवरण प्रसिद्ध केले आहे.
देशात महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांची करोना परिस्थिती अतिशय बिकट आहे. या राज्यांमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या फैलावामुळे सध्या देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री आठ वाजता जनतेला फेसबुक लाईव्हद्वारे संबोधित करताना बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून १५ दिवसांच्या कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे.