अमरावती : हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसून, अनेकदा मदतीची विनंती करून देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आल्याचे म्हणत, खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या. मातोश्रीसमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी नवनीत राणा यांनी दिला.
नवनीत राणा म्हणाल्या की, येत्या रविवारी आम्ही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन देऊन त्यांना विनंती करणार आहोत. त्यांनी स्विकारले तर ठीक, अन्यथा आम्ही मातोश्रीसमोर आंदोलन करु, असा इशारा त्यांनी त्यांनी दिला.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांसाठी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केले होते.