औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यानक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सरकार पडण्याच्या भाजपच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यावर हल्ला केला आहे.
सरकार पडणार असं सांगणारी ज्योतिष विद्या खरी नाही हे सिद्ध झाले आहे. पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते, त्या चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खरी झाली नाही, तर चकवेगिरी करण्यासाठी रावसाहेब दानवे समोर आले आहेत, असं म्हणत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला.
भाजपचेच अनेक मोठे नेते हे मोठ्या संख्येने काँग्रेस आणि राष्ट्रवादीत घरवापसी करणार आहेत, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून गेलेले आमदार भाजप सोडण्याच्या मनस्थितीत आहेत, त्यांना टिकवून ठेवण्यासाठीच सरकार पडेल असं भाजप बोलत आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडी सरकार 5 वर्षं पूर्ण करेल, असा विश्वासही नवाब मलिक यांनी बोलून दाखवला.
“ठाकरे सरकार हे पूर्णपणे अपयशी, गोंधळलेलं आणि दिशा नसलेलं सरकार आहे. वर्षभर तुम्ही कसं काम करता, ते जनतेने पाहिलं. आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त चंद्रकांतदादांनी टीकास्त्र सोडलं होतं.
Read Also :
‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था, नारायण राणेंची टीका
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल : मंत्री हसन मुश्रीफ
सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या महिलांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा