मुंबई – देशातील वाढत्या कोरोनाच्या संकटावरून साध्य मोदी सरकाराला सर्वच पक्षांकडून टार्गेट केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी देखील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आपल्या देशाला अडचणीत टाकून इतर देशांना लस देणे योग्य नाही. याचा अर्थ स्पष्ट की, कुठलंही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपध्दत योग्य नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे आरोप केले. “निवडणूकांसाठी व भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. लसीचे उत्पादन आपल्याकडे कमी असताना इतर देशांना लस देण्यात आली असा आरोपही त्यांनी केला आहे.
आता हे सगळं सोडून देशात जे कोरोनाचे संकट ओढवले आहे. या आरोग्य आणीबाणीत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देण्याचाअसा कार्यक्रम तयार करावा, अशी सूचना मलिक यांनी केली.
निवडणुकांच्या काळात भाजपने कोरोना संकटाला थोपविण्यासाठी काहीच पावलं उचलली नाहीत. उलट लॉकडाऊन करू नका असंच भाजपच्या नेत्यांचं म्हणणं होत. आता कोविड टास्क फोर्स आणि सुप्रीम कोर्टानेही त्यावरून सवाल केला आहे. देशामध्ये लसीचा तुटवडा आहे. कोरोना लस केंद्राला वेगळ्या दराने आणि राज्यांना वेगळा दराने विकली जात आहे. एकाच देशात एकच कंपनी एकच लस तीन वेगवेगळ्या दराने कशी विकते? असा सवाल करतानाच कोर्टाची कारवाई सुरूच राहणार आहे. मात्र आपण आपल्या देशाला कुठे घेऊन चाललो आहे. याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष देणे गरजेचं, असं आवाहनही नवाब मलिक यांनी केलं.