पुणे : भाजपच्या काळात जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. जलयुक्त शिवार बाबत कॅगने आपला अहवाल दिला आणि एकाच चर्चा सुरु झाली त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील जलयुक्त शिवार बाबत भाष्य केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले की, “हे जाणुनबुजून करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत”.पुण्यात अजित पवारांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
“सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे ? कॅगचा अहवाल कोणाच्या काळात आला ? कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडे होतं त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषेदत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं होतं….त्यांनीच तसंच सूतोवाच केलं होतं,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत…
“राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळंबेरं समजू नये. भाजपाचं सरकार असताना आम्हीदेखील लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना भेटायचो. मी तर सगळ्यांना भेटत असतो, तुम्ही मला कित्येक वर्ष ओळखता,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. खडसेंबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे”.
Read Also
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
https://t.co/QsIqDePhKA#CmThackarey #MVA
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020