राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी गेलेल्या नेत्यांमध्ये सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे या नेत्यांचा समावेश आहे.
या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील येणं बाकी आहे. मात्र बैठक संपल्यानंतर बाहेर पडताना नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘आज मी, सुनील तटकरे, आदिती तटकरे एकत्र आलो हा योगायोग नाही. पण देवेंद्र फडणवीस यांची सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आणि बिहारचे निवडणूक प्रभारी होणं हा योगायोग आहे,’ असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपला टोला लगावला. मात्र यावेळी मुंडे यांनी बैठकीतील चर्चेबाबत माहिती देणं टाळलं.