मुंबई : लोकडाऊनचा जेवढा फटका शहरातील व्यवसायांना बसला तेवढाच फटका ग्रामीण भागातील व्यवसायांना देखील बसला आहे. कोरोना सारख्या संकटात देखील शेतकरी तग धरून उभा होता मात्र हवामानाने साथ न दिल्याने शेतातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागलं याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री दादा बसे यांची भेट घेतल्याचे समजते.
रोहित पवार हे देखील शरद पवार यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेल्याचे अनेकदा पहायला मिळाले आहे. राज्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याबाबत पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांची रोहित पवार यांनी भेट घेऊन चर्चा केली.
कोरोनासोबत हवामानाने देखील साथ न दिल्यामुळे शेतकरी वैतागलेला आहे म्हणूनच रोहित पवार यांनी थेट कृषी मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन यावेळी मंत्री महोदयांनी दिलं असल्याचे देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
राज्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिकांचं नुकसान झालं. याबाबत पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत यासाठी कृषिमंत्री @dadajibhuse साहेबांची भेट घेतली. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं. pic.twitter.com/k5TGkFdSmZ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 23, 2020
Read Also
मोठी बातमी! शिवसेनेचे दिग्गज नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागणhttps://t.co/NFm4musiz2
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020