अहमदनगर : नगरमध्ये सभापती निवडणुकीत राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. भाजपचा सभापतीपदाचा उमेदवारच राष्ट्रवादीत दाखल झाल्याने नगरमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं.त्यातच आता भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते देखील येत्या काळात आमच्यात येतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. तर स्थायी समितीच्या सभापती संदर्भात वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असून त्यात कोणतीही अडचण राहिली नाही, असंही संग्राम जगताप यांनी सांगितलं.
महापौरपदाची निवडणूक येत्या काही महिन्यावर होत आहे. त्यामुळे नगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. तर येत्या काळात कोणते नवे राजकीय समीकरण पाहायला मिळेल याकडे नगरकरांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा
अहमदनगरला स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यानं, मनोज कोतकर हे बिनविरोध सभापती झाले आहेत. तर सभापतीची निवडणूक होती यामध्ये मागच्या आठ दिवसांपूर्वी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली होती,असं जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत एकत्र येऊन सर्वांनी निर्णय घेतला. त्यानुसार शिवसेनेने राष्ट्रवादीला स्थायी समिती पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं मंत्री गडाक यांनी सांगितलं.वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे तीन पक्ष एकत्र आले आणि आता हळूहळू पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं गडाखांनी यावेळी म्हटल आहे.
Read Also
अजितदादांचे वरिष्ठ किती ‘इममॅच्युअर’ आणि… डिलिट केलेल्या ‘त्या’ ट्विटवरून भाजपची टीकाhttps://t.co/zy8inSc0tu#AjitPawar #TusharBhosale #NCP #BJP@AcharyaBhosale
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020