पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाकेबाज खासदार डॉ.अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या जोरदार पद्धतीने सुरु होती. त्यासंबंधीच्या बातम्या देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले होते. ज्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की,राष्ट्रवादीच्या चार आमदारांना ज्यामध्ये शिरूरचे आमदार अशोक पवार,जुन्नरचे आमदार बेनके,आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील तर हडपसरचे चेतन तुपे यांना कोल्हेचा त्रास होत असल्यामुळे अमोल कोल्हे यांनी भाजपचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट लिहिलेले दिसत आहे.
गिरीश बापट आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यामध्ये एक बैठक झाली असून त्यामध्ये कोल्हे यांनी माझ्या प्रसिद्धीचा फायदा भाजपने करून घ्यावा आणि केंद्रात मंत्रिपद द्यावे असे म्हंटल्याचा उल्लेख दिसून येतो.अशा प्रकारच्या बातम्यांमुळे शिरूर मतदारसंघ चांगलाच ढवळून निघालेला असताना खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतः या बातमीचे कात्रण ट्विट केले आहे.
काय म्हणाले आहेत अमोल कोल्हे यामध्ये
अशा प्रकारच्या बातमीचे कात्रण ट्विट करत कोल्हे म्हणतात “१५ वर्षे “ मालिका क्षेत्रात काम करताना एवढा अफाट कल्पनाविस्तार आणि करमणूक पहायला मिळाली नव्हती ! त्यामुळे धन्यवाद,विशेष म्हणजे यामध्ये अमोल कोल्हे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना थेटपणे टॅग करत हा टोला लगावला आहे.
“१५ वर्षे “ मालिका क्षेत्रात काम करताना एवढा अफाट कल्पनाविस्तार आणि करमणूक पहायला मिळाली नव्हती!
मन:पूर्वक आभार!@MPShivajirao pic.twitter.com/FyR8n8AmPx— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 19, 2020