मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र सोबतच आधीपासून या आरक्षणाचा लाभ घेत असणाऱ्यांना यामुळे कोणताही परिणाम होणार नाही असे स्पष्ट केले आहे. मोठ्या खंडपीठाकडे हा खटला सोपवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर यावर तोडगा काढत असल्याचे म्हटले आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. राज्य सरकार न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडण्यात अपयशी ठरत असल्याचे म्हटले जात आहे. शरद पवार मराठा आरक्षणाबाबत बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत लवकरच तोडगा काढण्याची राज्य सरकारची इच्छा असून त्यांनी बैठक बोलावली आहे. त्यावर आता काय निर्णय घेतात पाहूया.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून, बैठकीत पुढील रणनितीसंदर्भात उपलब्ध कायदेशीर पर्यायांवर विचारविनिमय झाला.