अहमदनगर :- केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसने किसान मजदूर बचाओ दिन पाळला व आंदोलन केले. नगरमध्ये या मागणीसाठी काँग्रेसची दोन स्वतंत्र आंदोलने झाली.
एकाच मागणीसाठी अवघ्या पाचशे मीटर अंतरावर काँग्रेसची दोन आंदोलने झाल्यामुळे नगरमधील शिवसेनेच्या पाठोपाठ आता काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याच जिल्ह्यात हे चित्र निर्माण झाल्याने आता त्यावर ना.थोरात काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेत स्विकृत नगरसेवक निवडीवरुन मागील चार दिवसांपासून रणकंद सुरू होते. त्यातच आज केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसची दोन आंदोलने झाली. त्यामुळे नगरच्या काँग्रेसमध्ये सुद्धा आता दोन गट सक्रीय झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली एक व काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एक, अशी दोन आंदोलने नगरमध्ये झाली.
नगर शहरातील काँग्रेसच्या एका गटाने भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली वाडिया पार्क येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर स्वतंत्र आंदोलन केले. तर मार्केट यार्ड मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे मार्केट यार्ड ते वाडिया पार्क हे अंतर पाचशे मीटरचे आहे. त्यामुळे अवघ्या पाचशे मीटरच्या अंतरावर एकाच मागणीसाठी काँग्रेसची दोन स्वतंत्र आंदोलने झाल्याने शहर काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Read Also ;
मुख्यमंत्री योगींविरोधात देशभरातून संतापाची लाट https://t.co/axuyIJ3nUl @nawabmalikncp @sachin_inc @Awhadspeaks @NCPspeaks @AnilDeshmukhNCP @PratapSarnaik @neelamgorhe @SardesaiVarun
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 3, 2020