मुंबई : ‘अमृता ताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही. आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा. मनस्वास्थ चांगले राहते’, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीसांवर केली
अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरवर अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘शिवसेनाच आजही रुग्णवाहिका आणि अंतिम शववाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते, हे देखील विसरु नका. आपल्या नावात ‘अ’ च महत्त्व आहे ते निघाले तर मृता राहील. शिवसेनेची काळजी करु नका. आपले मानसिक स्वास्थ जपा. ‘अ’ मंगल विचार मनात आणणे अयोग्य बरे का’, असा चिमटा नीलम यांनी काढला
बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केला आहे. तसंच शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या साथीदारांना ठार मारले, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्र कुठेही नेऊन ठेवला असेल पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद.., असंही अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
#शिवसेना # एका शब्दाचे महत्व असते.*
*#अमृताशब्दातील अ चे भान महत्वाचे*
अमृताताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत,शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही,आपल्या नावातील"अ"मृतावस्थेत जावू देवू नका,मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा २ @fadnavis_amruta pic.twitter.com/ZE74uqEPjH— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 12, 2020
Read Also :
मुंबईत अधिवेशनाने कोरोना होणार नाही का?; सुधीर मुनगंटीवार
“आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर “राऊतांनी सोमय्यांना सुनावले