मुंबई : राज्यात काहीजणांना माणसांची इंजेक्शन्स लागू पडत नाहीत. त्यांना गुराढोरांची इंजेक्शन्स लागतात. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर केली.या टीकेचा राणे पुत्र निलेश आणि नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट..मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का ? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया,मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते ? अशा आशयाचे ट्विट करत नितेश राणे यांना पुन्हा शिवसेनेला डिवचले आहे.
बिहार च्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते..जास्तच हवा भरलेली आज..किती आव..’टाचणी’ तैयार आहे..फक्त योग्य वेळ येऊन दया.. असा इशारा देखील यावेळी नितेश राणे यांनी दिला आहे.
तर निलेश राणे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो असे म्हणत निलेश राणे यांनी पुन्हा ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दुसऱ्यांची 'पिल्ल' वाईट..
मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा "श्रवणबाळ" जन्माला घातला आहे का?
इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया..
मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!— nitesh rane (@NiteshNRane) October 25, 2020
बिहार च्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते..
जास्तच हवा भरलेली आज..
किती आव..
'टाचणी’ तैयार आहे..
फक्त योग्य वेळ येऊन दया..— nitesh rane (@NiteshNRane) October 25, 2020
छोट्या फावड्याला वाचवण्यासाठी मोठा फावडा काल इतका बरळत होता की त्याचं त्यालाच कळलं नाही तो काय बोलतोय. ज्यांच्या घरात घाणेरडी लफडी आहेत ते दुसऱ्यांवर गल्लीच्या कुत्र्यासारखे भुंकले. सम्राठाची लफडी महाराष्ट्राला कळली तर ढुंगण लपून महाराष्ट्र सोडावा लागेल अशा आशयाची बोचरी टीका निलेश राणे यांनी कालच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना केली आहे. अशा आशयाचे ट्विट देखील यावेळी त्यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला होता त्यावर आता हळू हळू विरोधकांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
Read Also
.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे https://t.co/4rbrPIKEQH @OfficeofUT @CMOMaharashtra @ShivSena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 25, 2020