सिंधुदुर्ग – कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवली आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांची विकास करण्याची कुवत नाही,” अशी घणाघाती टीका माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी केली.
राज्यात नकुत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यावेळी राज्यात स्थानिक पातळीवर राजकरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीत बड्या नेत्यांचा प्रत्यक्षपणे सहभाग नसला तरी, सर्व पक्षांचे नेते या निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. निकाल हाती आल्यानंतर राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चांगल्या जागा जिंकल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली.
“कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवली आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आणि दीपक केसरकर यांची विकास करण्याची कुवत नाही,” अशी खोचक टीका त्यांनी शिवसेना नेत्यांवर केली.
भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना निवडणुकीच्या मुद्द्यावरुन चांगलंच घेरलं. शिवसेनेच्या नेत्यांनी फक्त राणेंवर टीका करण्यात वेळ घालवला. याच कारणामुळे त्यांना जनतेनं नाकारलं,” असा दावा राणेंनी केला. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी राणे कुटुंबावर खोटीनाटी टीका करुन मतं मिळवण्याचे दिवस संपल्याचेही निलेश राणे म्हणाले