नवी दिल्ली : मागील अनेक महिन्यांपासून सीमेवर चीनसोबतच सुरू असलेल्या संघर्ष अद्याप संपलेला नाही. चीनबरोबर लडाखमध्ये सुरू असलेल्या वादावर अद्याप काही ठोस निष्कर्ष निघालेला नसल्याची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. सोबत आपल्या जर कोणी डिवचेल, त्याला सोडणार नाही, असा गंभीर इशारा देखील संरक्षणमंत्र्यांनी चीनला दिला आहे.
चीनबरोबर चर्चा सुरू आहे. लवकरच आणखी एक सैन्यस्तरीय चर्चा होणार आहे. आतापर्यंत ज्या चर्चा पार पडल्या, त्यातून काहीच तोडगा निघालेला नाही. आता आहे तीच परिस्थिती कायम आहे, मात्र ती फारशी चांगली नाही, असे राजनाथ सिंह यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती म्हटले आहे.
#WATCH India has a sharp focus. ‘Jo hume chedega hum usse chhorenge nahi’. We want to maintain peaceful relations with all nations: Defence Minister Rajnath Singh to ANI, on being asked if this year's incident at the border was a result of possible collusion between China-Pak pic.twitter.com/AxcPSKxEfs
— ANI (@ANI) December 30, 2020
कोणताही विस्तारवादी देश आपली भूमी बळकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखण्याचे सामर्थ्य आणि धमक भारतामध्ये आहे. मग तो जगातील कोणताही देश असो, असे सूचक वक्तव्य देखील यावेळी त्यांनी केले.
भारत-चीनमध्ये प्रदीर्घ काळापासून सीमावाद सुरू आहे. चांगलं झालं असत हे वाद अगोदरच संपले असते. जर हे वाद संपुष्टात आले असते, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असेही राजनाथ सिंह म्हणाले.