मुंबई : आपल्या पक्षाच काम बोलतंय. त्यामुळे, अनेकांच्या पोटात मुरडा येतोय. त्यांच ते पाहतील, त्यांना औषध द्यायला मी डॉक्टर नाही. पण राजकीय औषध देईन. खर म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. मी सत्तेसाठी लाचार होणार नाही, परंतु उगाचच कोणाची पालखी वाहणार नाही, अशी खणखणीत प्रतिक्रीया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. पण स्वबळ म्हणजे काय? जे माझे आजोबा सांगायचे आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे ते म्हणायचे आत्मविश्वास आणि आत्मबळ महत्त्वाच. ज्या वेळी शिवसेना स्थापन झाली तेंव्हा मराठी माणूस क्षुल्लक होता. मान सोडाच परंतु अपमान सहन करत होता. शिवसेना तेंव्हा स्थापन झाली नसती तर, बाकीच्यांचे काय खरे होते. स्वबळ म्हणजे फक्त निवडणूका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ आहे. जेंव्हा शिवसेनेवर संकुचितपणाचे, प्रांतवादाचे आरोप झाले तेंव्हा देखील शिवसेनाप्रमुख पूढे गेले, याला स्वबळ म्हणतात. गेल्या निवडणूकीत जे दुर्दैवाने पराभुत झाले त्यांच्याशी मी संवाद साधला. त्यांना मी सांगितल पराभूत शब्द काढा, जो खचला तो संपला. संकटाला घाबरला तर तो शिवसैनिक कसला? संकटाच्या छाताडावर चाल करुन जाणे ही आपली शिकवण, असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाना साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले, स्थानिय लोकाधिकार समितीच्या शिवराय संचलन कार्यक्रमात मी जातो. त्या भागात चौफेर पाहतो. चौफेर पाहताना मोठमोठ्या ऑफिसकडे, इमारतींकडे, गच्चीतुन, खिडकीतुन, झाडावर चढुन लोक पहात असतात. हे अप्रुप आहे. पूर्वी या खिडक्या बंद होत्या, शिवसेनेने मराठी माणस तिथे घुसवली. मनगट आहेत पण त्यात ताकद नाही तर फायदा नाही. मराठी माणसाला शिवसेनाप्रमुखांनी तुझ्या मनगटात ताकद आहे. तलवार पेलवण्याची ही जाणीव करून दिली तेंव्हा मराठी माणुस पेटुन उठला. टीका करणारे तुम्हीं काहीही केलत तरी टीका करणार. तुमच्या मनाला जे पटत ते करा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधांकाचा खरपुस समाचार घेतला.
माझ्या आजोबांनी दिलेला हा वारसा आहे.!
आम्हीं एकमेकांना भेटल्यावर जय महाराष्ट्र बोलतो, हिंदुत्वाबद्दल सांगत असताना अनेकांचा गैरसमज होतो की महाविकास आघाडी म्हणजे हिंदुत्व सोडलं. ते काही पेटन्ट नाही कोणाचे. हिंदुत्व आमच्या हृदयात आहे. ५५ वर्षे आपण जे राजकारण पाहिल त्यात जे दिग्गज राजकारणी होते. आताच्या नेत्यांची उंची कळतेय. या कोरोनाच्या काळातही जे राजकारण चालले आहे ते राजकारणाचे विकृतीकरण होते, किंबहुना विद्रुपीकरण आहे. तुमच्यासारखे शिवसैनिक लाभणे हे माझे भाग्य आहे. हे सर्व तुमच्या मेहनतीच आणि आशिर्वादाच फळ. तुमच्याशिवाय मी एक पाऊल काय, एक कणही पूढे जाऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने माझ्या आजोबांनी दिलेला हा वारसा आहे, असेही त्यांनी सांगितले.
खुन खराबा करणे ही शिवसैनिकाची ओळख नाही
आपल्या प्रशासनाची सुद्धा कमाल आहे. पहिल्या, दुसर्या लाटेच्या आठवणी सुद्धा नकोशा वाटतात. फोन आला की धस्स होत असे. परंतु प्रशासनाची मेहनत, जनतेची मदत शिवसैनिकांची समाजसेवा इत्यादीच हे फलित आहे. त्यामुळे, खुन खराबा करणे हा शिवसैनिकाची ओळख नाही. परंतु अन्यायावर वार करणे आहे. रक्तपात नाही तर रक्तदान करणे ही शिवसैनिकांची ओळख आहे. आरोप करणार्यांपैकी कितीजणांची ही ओळख आहे? हज्जारो शिवसैनिकांनी रक्तदान केले. तेंव्हा विचारत नाही की हे कुणाला दिल जाणार. हे शिवसेनेच हिंदुत्व, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना अजुनही एक पाऊल पूढे जात आहे
प्रत्येक आपत्तीत पहिला धावुन जातो तो शिवसैनिक. परंतू, विरोधकांकडून बदनामी करण सुरु आहे. जो आरोप करतोय तो कोण? आम्हीं आमच्या रुबाबात जात आहोत. ५५ वर्षे काही साधीसुधी नाहीत. महाराष्ट्राचा अनुभव घेताना अन्य राज्याचा अनुभव काही फार वेगळा नाही. अजुन किती काळ हे संकट चालेल हे सांगता येत नाही. कोविड नंतर देखील पोस्ट कोविड तक्रारी आहेत.
पोस्ट कोविड आरोग्यच्या तक्रारी आहेत. परंतु अन्य देखील परिस्थिती उद्भवणार आहे. परिवारातील लोक निवर्तली आहेत, कर्ता माणूस गेला आहे, रोजगार गेले आहेत, अनेक रोजगार बुडाले आहेत. रोजीरोटी मंदावली आहे. पोस्ट कोविड माझ काय होणार या एका चिंतेत देशवासी आहेत. अशा वातावरणात स्वबळ इतर देशवासी ऐकुन घेणार नाहीत. हा विचार आपण केला नाही तर अराजकता मोठा शब्द ठरेल परंतु अस्वस्थतेकडे चालला आहे, असे उद्दव ठाकरे यांनी सांगितले.
राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षांनी एकत्र या.!
सर्व पक्षांनी राजकारण बाजुला ठेवुन जर अर्थकारणाची घडी बसवण्याकडे लक्ष नाही दिले तर ते योग्य नाही. वर्धापन दिनी राजकीय कार्यक्रम देण्याऐवजी कोरोना मुक्तीचा कार्यक्रम देणारे कोणी नसतील. कोरोना मुक्ती हा एक उपक्रम न राहता चळवळ निर्माण व्हायला हवी. कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत जनसहभाग येत नाही तोपर्यंत तो यशस्वी होत नाही.
कोरोनातुन बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत यात सहभागी होत नाही तोपर्यंत हे कठीण नाही तर अश्यक्य आहे. आम्हीं आमच्या पाऊलावर खंबीरपणे पुढे वाटचाल करू, ही शिवसेनेची ताकद, हे शिवसेनेचे ब्रीद. शिवसेना ही एक संघटना नाही, तो एक विचार आहे. तो पूढे जात राहणार आहे. परंतू, या संकटाला हटविण्यासाठी राजकारण बाजूल ठेवून सर्वपक्षातील नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे उद्दव ठाकरे यांनी बोलतांना सांगितले.