पुणे : मी भूमिका बदलणारा नाही, मी स्थिर आहे, भाजपाला आणि ईडीला तुम्ही घाबरला आणि बदललात, त्यामुळे तुम्हाला माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया ‘पॉलिटिकल महाराष्ट्र’ सोबत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटातील खासदार प्रफुल पटेल यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्यावर आता अमोल कोल्हे यांनी पटेलांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
लोकसभेच्या चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल बोलत होते, त्यावेळी ते म्हणाले की ‘या देशाचा विकास कोणी केला तर मोदींनी. त्यामुळे आपण भाजपसोबत जायला पाहिजे असे म्हणणारा अचानक कसा पलटला, याच मला आश्चर्य वाटतं असं म्हणत त्यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हेंवर टीकास्त्र सोडले होते. तसेच खासदार झाल्यावर तीन वर्षांनी अमोल कोल्हे माझ्याकडे आले. म्हणाले मला खासदार रहायचं नाही, लोकांना वेळ देता येत नाही. नंतर या देशाचा विकास कोण करु शकेल तर नरेंद्र मोदी. असे सांगून आपल्याला भाजपबरोबर जायला पाहिजे असंही म्हणाले होते. जे दोन जुलैला अजितदादांच्या शपथविधीला आले, अॅफिडेवटवर सही केली आणि नंतर दुसरीकडे गेले, असा एका ठिकाणी स्थिर नसणारा माणूस आपल्या कामाचा नसतो, अशा शब्दांत त्यांनी कोल्हेंवर टीका केली.
हेही वाचा…” शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद”
त्यावर कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माझ्यावर बोलण्याचा अजिबात प्रयत्न करू नये.कारण मी माझ्या जागेवर स्थिर आहे. तसेच मी बोललो तर त्यांना खूप अडचणीचे होईल असंही कोल्हे पुढे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…आगामी काळात काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील ; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ
हेही वाचा..“अमोल कोल्हेंना त्यांची जागा दाखवून द्या,” कोल्हेंच्या विरोधात अजितदादांनी शड्डू ठोकला
हेही वाचा…बारामतीनंतर आता पुणे लोकसभा निवडणुकीकडे महायुतीचं लक्ष, पुण्यात महत्वाची बैठक
हेही वाचा…“एका ठिकाणी स्थिर नसणारा माणूस आपल्या कामाचा नसतो,” प्रफुल्ल पटेलांचा कोल्हेंवर निशाणा