मुंबई : महाराष्ट्रात परवा होत असलेली Mpsc ची परीक्षा पुढे ढकलन्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी खासदार संभाजीराजे यांनी सरकारला काही गंभीर इशारे दिले होते म्हणून सरकार गोंधळात होते.
मुख्यमंत्र्यांनी हि परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. मराठा समाजाच्या वतीने खासदार संभाजीराजे यांनी सरकारच अभिनंदन केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागिल काही काळापासून महाराष्ट्रात राजकारण तापलेले होते.
आता मराठा समाजाने सर्व गोष्टींचा अभ्यास करायला शिकले पाहिजे. मागच्या आणि आताच्या सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दिल्या का? नुसते आकडे नको, सरकारने प्रत्यक्षात मदत दिली पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
तत्पूर्वी सोलापुरातील आजच्या मराठा ठोक क्रांती मोर्चाला लोकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. या आंदोलकांकडून उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधा घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टातून स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज पेटून उठला आहे. त्यामुळे आता या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या भाषणादरम्यान आंदोलकांना कोणतीही जाळपोळ किंवा नासधूस न करण्याचे आवाहनही केले.
Read Also ;
भाजपने शिवसेनेला दिली ‘ही’ ऑफर ! महापौरांनी दिले घडलेल्या घटनेचे स्पष्टीकरणhttps://t.co/0UT9jtrtKu#BJP #Shivsena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 9, 2020