मुंबई : मराठा आरक्षणामुळे सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वातावरण तापलेलं असताना आता ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. कारण mpsc च्या सर्व परीक्षा पुढे ढकल्याने राज्यातील सत्तापक्षातील आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेते सरकारवर नाराज होते. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती, तथापि महाविकास आघाडी सरकार फक्त मराठ्यांचाच विचार करत असल्याची टीका काही ओबीसी नेत्यांनी केली होती.
आता त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजातील काही नेते आणि कार्यकर्ते यासंदर्भात पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज पुण्यात बैठक घरत आहेत. मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यात येऊ नये. तसेच लांबलेल्या सर्व परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी सुद्धा या संघटनांनी केली होती, आता यावर महाविकास आघाडी कशा पद्धतीने उत्तर देते हे फार महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील असून अशा लोकांचा आम्ही निषेध करतो. राज्यातील मागासवर्गीय अधिकाऱ्यांची आरक्षणांतर्गत किती पद भरण्यात आले असून किती पद राहिली आहेत शिवाय किती मागासवर्गीय अधिकाऱ्यांना आरक्षणाच्या आधारे प्रमोशन देण्यात आले आहे, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे.
मात्र ही माहिती उपलब्ध असूनही महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात द्यायला तयार नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. निवडणुकीसंदर्भात ॲड. प्रकाश आंबेडकर हे सध्या बिहार मध्ये आहेत. मागासवर्गीय बाबत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना त्याचा जाहीर निषेध केला आहे.
Read Also ;
कमाल झाली, भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं काँग्रेसच्या ‘पंजा’ला मतदान करण्याचं आवाहन https://t.co/ESsOQwnavC @BJP4Maharashtra @INCMP @JM_Scindia @sachin_inc @INCMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020