पुणे : ओबीसी समाजाने मन मोठं केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत अशा प्रकारचे विधान करून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा सुतोवात अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात आला. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा आज धनगर समाजाचे नेते आणि ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
याबाबत प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, मराठा समाज हा महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये नेहमी राज्यकर्ती जमात म्हणून मुख्य भूमिकेत राहिला आहे. शेकडो वर्षांपासून आर्थिक संसाधने ,शेती ,कारखानदारी ,सहकार ,शिक्षण संस्था राजकारण यामध्ये मराठा समाजाने व्यापलेली आहेत. सरपंच पदापासून अलीकडे पर्यंत मुख्यमंत्री पदही मराठा समाजाकडे होते.
काही प्रमाणात मराठा समाज मागास राहिला असेल तर त्याला मराठा राज्यकर्तेच जबाबदार आहेत. आरक्षण मिळाले तरच विकास होईल ,अशी भूमिका मराठा संघटनांनी घेतली आहे,परंतु आरक्षण म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही ,हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित होण्यासाठी वंचित घटकांना प्रतिनिधित्व देणे हा आरक्षणाचा मूळ उद्देश आहे असं त्यांनी सांगितले.
तर मंडल आयोगाच्या अंमल बजावणीनंतर काही प्रमाणात शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व मिळायला सुरुवात झाली आहे. त्यातही मराठा समाज वाटेकरी झाल्यास ५२ टक्के ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि संघर्ष करेल, मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेला मागास आयोग हाही असंवैधानिक आहे असंही लक्ष्मण हाकेंनी सांगितले आहे.
Read Also
अशा नटवीने शेतकऱ्यांबद्दल बोलणे म्हणजे… राजू शेट्टींची कंगनावर टीकाhttps://t.co/qPruhT0pdU#RajuShetti #KanganaRanaut #MarathiNews #KisanBill2020@rajushetti @KanganaTeam
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 22, 2020