दिल्ली : नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. त्या पराभवातून काँग्रेस आणखी सावरलेली नाहीय. आत्मचिंतनाच्या बैठका अजूनही सुरु आहे. अशातच बिहारमध्ये काँग्रेसला आता मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. कारण कारण बिहारमधले काँग्रेसचे 9 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.
बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसने अॅक्टीव्ह होत संघटनात्मक बदल केले. काँग्रेस आता सावरतीय, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच काँग्रेसचे 11 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा आहेत. तशी माहितीच काँग्रेसच्या माजी आमदारांनी दिली आहे. त्यामुळे बिहारमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
काँग्रेस पक्षाचे काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार भरत सिंह यांनी केला आहे. त्यानंतर बिहारच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आहे. 19 पैकी 11 आमदार काँग्रेसचा हात सोडणार असल्याची शक्यता माजी आमदार भरत सिंह यांनी वर्तवली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार शक्तिसिंह गोहिल यांच्याकडे बिहारचं काँग्रेस प्रभारीपद होतं. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती त्यांनी काँग्रेस हायकमांडला केली होती.
त्यांची विनंती मान्य करत पक्षनेतृत्वाने त्यांना बिहार प्रभारी पदावरुन मुक्त केलं. गोहिल यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या खांदेपालटानंतर काँग्रेसचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे.
‘फुटणाऱ्या आमदारांनी पैसे देऊन तिकीट विकत घेतले होते’
“काँग्रेसच्या 19 आमदारांपैकी 11 आमदार असे आहेत ज्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली असली तरी ते काँग्रेसचे नाहीत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट घेतलं आणि आमदार झाले”, असा गौप्यस्फोट भरत सिंह यांनी केला आहे.
काँग्रेस आमदार फुटणार, NDA मध्ये सहभागी होणार?
राजद आणि भाजप (NDA) आपलं संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी NDA मधील अनेक नेते काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहेत, असा दावा भरत सिंहांनी केलाय. दरम्यान त्यांचा हा दावा काँग्रेस नेते फेटाळत आहेत. काँग्रेस पक्ष एकसंध आणि एकजूट असल्याचं काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेश सिंह यांनी म्हटलंय.
Read Also :
‘नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा’, उद्धव ठाकरेंना ‘या’ आमदाराने सूचवलं नाव
प्रस्ताव ‘मंत्रालया’तून आला की ‘वर्षा’वरून? मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी
औरंगाबाद नामांतरण : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
‘भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही’
‘औरंगाबादचं नाही तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं’, प्रकाश आंबेडकरांची मागणी