राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात आहे. ‘जो उत्साह दारुची दुकाने उघताना दाखविला. त्यातील अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडण्यासाठी सरकारने दाखवायला हवा’, असा निशाणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर साधला आहे. ते कोल्हापूर-सांगलीच्या दौऱ्यावर असताना बोलत होते.
धार्मिक स्थळांबाबत केंद्र सरकारने सुट दिली आहे. त्याला महिना होत आला. त्यानुसार देशातील इतर राज्यांच्या ठिकाणी धार्मिक स्थळे खुली झाली. परंतु महाराष्ट्रात अद्याप नाहीत. राज्यात दारुची दुकाने, मॉल्स उघडू शकतात तर मग धार्मिक स्थळे उघडायला काय अडचण आहे?, असा सवाल फडणवीस यांनी केला.
दारूची दुकाने उघडण्याने काय होते आणि मंदिरं खुली केल्याने काय होतं, हे सर्वांना कळते.
जो उत्साह दारूची दुकाने उघताना दाखविला, त्यातील अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडण्यासाठी सरकारने दाखवायला हवा : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 29, 2020
धार्मिक स्थळं उघडली आणि कोरोना वाढला असे आतापर्यंत कुठेही घडलेले नाही. जनतेत जागृती झाली आहे. सामाजिक अंतर पाळून मंदिरे सुरू करता येऊ शकतात. राज्यात दारु दुकानापेक्षा धार्मिक स्थळे उघडून आध्यत्मिक वातावरण तयार झाले तर त्याचा जास्त फायदा होईल, असेही ते म्हणाले.
पली कार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवले वास्तविक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांनी समजून घ्यावे की, आपली लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नाही, तर कोरोना विरुद्ध आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.