मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. त्यामुळे विरोधकांनी पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी मागणी केली. त्यामुळे आगामी दिवसात राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
नेमका आताच कसंय काय बापलेकींना कंठ फुटला…; भाजपचा सुप्रिया सुळे यांना खोचक टोला
तुम्ही किती गोंधळ घाला, राजीनामा घेतला जाणार नाही असं विरोधीपक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले. तरी देखील विरोधी पक्षाने विधान भवनाच्या पायऱ्यावरच आंदोलन सुरू केले आहे. भाजप आमदार आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, विखे पाटील, इत्यादी भाजपच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली.
अजित पवारांना कुठलीही किंमत राहिली नाही; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
भाजपचे नेत्यांनी यावेळी दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा द्या. महाराष्ट्राचे सरकार दाऊद समर्थक आहे का? असे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. जमीन व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांना इडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा धक्का बसला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापुर्वी झालेल्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला देखील भाजपने बहिष्कार टाकला. तसेच यावेळी अधिवेशन पंधरा दिवसापेक्षा अधिक दिवस चालणार असल्याने जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित करणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आगामी दिवसात राज्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे लक्ष आहे.
Read also:
- नवाब मलिक यांचे दाऊद कनेक्शन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चहापानावर बहिष्कार?
- गेल्या ३० वर्षांमध्ये आम्ही सापाला दूध पाजलं, आता तेच आमच्यावर फुत्कारतय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- धनगर समाज, यशवंत ब्रिगेडचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; ‘या’ प्रमुख मागण्यांचा केला पाठपुरावा
- ऑपरेशन गंगा अभियानावर राजकारण करण्याची गरज नाही; शिवसेनेला परराष्ट्र राज्य मंत्र्याचा टोला
- एका व्यक्तीच्या इगोमुळे सर्व जगाला त्रास; रोहित पवारांची रशिया युक्रेन युद्धावर प्रतिक्रिया