पुणे : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सात दिवसांपासून घणाघोर युद्ध सुरू आहे. या युद्धावर अजूनही तोडगा काढण्यात आला नाही. रशियाने युक्रेन मधील अनेक शहरं बेचिराख करून टाकली आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वित्त तसेच जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मत मांडले आहे.
कितीही गोंधळ घाला, नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी विरोधकांना ठणकावलं
रोहित पवार यांनी ट्विट म्हटलं आहे की, सध्याच्या परिस्थितीत आपल्याला रशियाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो, तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात आणि आपणच बरोबर आहोत असं त्या नेत्याला वाटतं तेव्हा त्याला थांबवणंही अवघड असतं.
सध्याच्या परिस्थितीत आपल्याला रशियाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेंव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेंव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात आणि आपणच बरोबर आहोत असं त्या नेत्याला वाटतं तेंव्हा त्याला थांबवणंही अवघड असतं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 2, 2022
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, रशियाबाबत बोलायचं तर केवळ एका व्यक्तीच्या इगोमुळं संपूर्ण जगाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.. आणि इगोने भरलेल्या अशा व्यक्तीने एखादा खेळ सुरू केला आणि त्यात त्याचा पराभव होत असला तरीही माघार न घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. यामुळं संपूर्ण जग आज वेठीस धरलं गेलंय.
भारताबाबत विचार करताना आपल्याला संरक्षणावर खर्च करावाच लागेल पण आज महागाई आणि बेरोजगारीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं असताना मोठ्या प्रमाणात संरक्षणावर खर्च वळवणं आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही. अन्यथा देशात अनेक अडचणी वाढू शकतात.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 2, 2022
भारताबाबत विचार करताना आपल्याला संरक्षणावर खर्च करावाच लागेल पण आज महागाई आणि बेरोजगारीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं आहे. अशावेळी मोठ्या प्रमाणात संरक्षणावर खर्च वळवणं आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही. अन्यथा देशात अनेक अडचणी वाढू शकतात. लोकशाही टिकवणं हे लोकांच्याच हाती असतं आणि लोकशाही चिरडण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर लोकांनीच पुढं येऊन ती वाचवण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- अजित पवारांना कुठलीही किंमत राहिली नाही; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
- नेमका आताच कसंय काय बापलेकींना कंठ फुटला…; भाजपचा सुप्रिया सुळे यांना खोचक टोला
- बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे…; फडणवीसांचा अधिवेशनापूर्वी सरकारला इशारा
- ठाकरे सरकारनं दाऊदला सिंपथी ठेवणारे लोक ठेवलेत, आम्ही चहापानाला जाणार नाही – देवेंद्र फडणवीस
- ठाकरे सरकार, संजय राऊतांचे कपडे उतरावयचे होते, म्हणून नीलला अर्ज करायला लावला – किरीट सोमय्या