मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्यावरून तुम्ही किती गोंधळ घाला, राजीनामा घेतला जाणार नाही असं विरोधी पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.
किरीट सोमय्यांच्या पुत्राचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला; मानेवर अटकेची टांगती तलवार
जमीन व्यवहार प्रकरणी नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. त्यामुळे अधिवेशनात त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष जोर धरून असतील. त्याआधी जयंत पाटील म्हणाले की, विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालू देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंचा पुन्हा खळबळजनक दावा; संघर्ष वाढणार
जयंत पाटील पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. खोटेनाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे, ही भाजपची कार्यपद्धती आहे. आर्यन खानला एसटीआयने दिलासा दिल्यानंतर त्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, आर्यन खानला फसविण्यात आले. नवाब मलिक याच कारवाईचा विरोध करीत होते. सगळं तुमच्या समोर उघड झाले आहे. उद्या पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीत अर्थसंकल्पाबाबत चर्चा केली जाणार आहे.
Read also:
- नवाब मलिकांच्या वेळी जे केले, तेच आताही करणार; प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी राष्ट्रवादी मैदानात
- आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे गोत्यात येणार? ड्रग्झ सापडले नसल्याचा एसआयटीचा अहवाल
- आर्यन खानला दिलासा; चौकशी समितीकडून आली सर्वात महत्त्वाची माहिती
- नारायण राणे हजर हो! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राणेंना चौकशीसाठी बोलवले जाणार
- बाप, बेटा, 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी, वसुली एजंट तुरुंगात जाणार; संजय राऊतांचा सूचक इशारा