मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया हे सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. किरीट सोमैया यांच्या आरोपांमुळे मागील काही दिवसांपासून राजकारण ढवळून निघाले आहे. एका मागून एका मंत्र्यांची विकेट काढायचे काम किरीट सोमैया यांनी केले आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून; नवाब मलिकांचा मुद्दा अधिवेशनात गाजणार?
दुसरीकडे किरीट सोमैया यांना महाविकास आघाडी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका मोठ्या बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हा किरीट सोमैयांचे पुत्र निल सोमैया यांच्या कंपनीत संचालक होता आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी भ्रष्टाचार केला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
ईडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे ? सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल
संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर निल सोमैया यांनी अटकेपासून अभय मिळावे म्हणून सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने नील सोमय्या यांना अटक पूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. प्रकरण काहीसे गंभीर वाटत असल्याने निल सोमैया यांचा जमीन फेटाळल्याचे बोलले जात आहे. आता निल सोमैया यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
4 मंत्री युक्रेनला पाठवून भाजपचा राजकीय इव्हेंट; भुजबळांचा केंद्र सरकारवर घणाघात
जर आता कोणी या प्रकरणात एफआयआर दाखल केली तर निल सोमैया यांना अटक होऊ शकते. आता महाविकास आघाडी सरकार काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किरीट सोमैया हे देखील दिल्लीवरून तातडीने महाराष्ट्रात आले आहेत. नुकताच त्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंवर घोटाळ्यांचा आरोप केला आहे.
Read also:
- राज्यपालांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही; राज्यापालांच्या वक्तव्यांवर आठवले यांची प्रतिक्रिया
- नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही – चंद्रकांत पाटील
- ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात…; चंद्रकांत पाटलांचं नवाब मलिकप्रकरणी वक्तव्य
- संजय राऊत ढेपाळले, त्यांना आता धड बोलता पण येत नाही – निलेश राणे
- युक्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती