नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामीशिवाय कोण विचारेल या वक्त्यांवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नेत्यांनी यावर प्रखर शब्दात टीका केली आहे. तर अनेक ठिकाणी राज्यपालांच्या या वक्त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आता याच मुद्यावर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
अन्य दोन पक्ष वाया गेले, आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंकडे – आशिष शेलार
राज्यपालांच्या माफी मागण्यांची मागणी होत असताना रामदास आठवले म्हणाले की, राज्यपालांनी यासंदर्भात काय वक्तव्य केले आहे, ते अगोदर तपासून पाहिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे रामदास गुरु होते हे खंर आहे. परंतु राज्यपालांच्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला. रामदास यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज होते. दैनिकांमध्ये आले आहे ते योग्य नाही. परंतु, रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते. त्यांना त्यांचं मार्गदर्शन होतं . त्यामुळे राज्यपालांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून; नवाब मलिकांचा मुद्दा अधिवेशनात गाजणार?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यांवरून ठिक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. यावेळी अनेकजण यावर राज्यपालांनी माफी मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
ईडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे ? सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल
राज्यपालांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात छत्रपती बद्दल वक्तव्य केले होते. महाराजा, चक्रवर्ती सगळे होऊन गेले, झाले. मात्र चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या जडणघडणीत आईचं मोठं योगदान असतं, तसचं आपल्या समाजात गुरुचं मोठं स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे. अशा पद्धतीचे विधान केले होते.
Read also:
- नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही – चंद्रकांत पाटील
- ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात…; चंद्रकांत पाटलांचं नवाब मलिकप्रकरणी वक्तव्य
- संजय राऊत ढेपाळले, त्यांना आता धड बोलता पण येत नाही – निलेश राणे
- युक्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
- 4 मंत्री युक्रेनला पाठवून भाजपचा राजकीय इव्हेंट; भुजबळांचा केंद्र सरकारवर घणाघात