मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना इडीने अटक केल्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप करीत आहे. त्यावरून राज्यात बऱ्याच राजकीय घडताना दिसत आहेत. भाजपने आता मलिक हटाव देश बचाव, असं अभियान सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आता नवाब मलिक यांना नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी; त्या आधी समोर आली माहिती
आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरताना सांगितले की, केंद्रीय तपास यंत्रणांना दहशतवादविरोधातल्या लढाईमध्ये सहकार्य करावं, देव, देश आणि धर्मासाठी हे बोलायची नाही. उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोलताना शेलार म्हणाले की, उद्धवजी आता करण्याची वेळ आली आहे. दाऊद आणि त्यांच्या हस्तकांविरोधात तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या.
मराठा समाजाच्या प्रमुख पाच मागण्या सरकार पूर्ण करणार; संभाजीराजेंच्या कोणत्या मागण्या होत्या…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल बोलताना शेलार पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्या समोर तुम्ही झुकू नका. नवाब मलिकांची हाकलपट्टी करा. या तीन पक्षांमध्ये आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंकडेच आहे. अन्य दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यासंदर्भात भूमिका घ्याल,अशी अपेक्षा देखील आशिष शेलार यांनी व्यक्त केली. दरम्यान, मागणी काही आठवड्यापासून राज्यात नवाब मलिक प्रकरण चर्चेत आहे. सत्ताधारी पक्ष नवाब मलिक यांच्या पाठीमागे उभा आहे तर विरोधी पक्षांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
Read also:
- संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयात जमा केले पुरावे; कारवाईची मागणी
- ईडीच्या कारवाईच्या विरोधात नवाब मलिक आक्रमक; मुंबई उच्च न्यायालयात मागितली दाद
- आता जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम करायचा; खासदार विखेंचा महाविकास आघाडीला इशारा
- संजय राऊत अजून एक राजकीय बॉम्ब फोडण्याच्या तयारीत; लवकरच पत्रकार परिषद घेणार
- लक्ष नाय काय म्हणता, या माणसाला टीका करण्याखेरीज काम नाही – नारायण राणे