मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा भेडसावणारा प्रश्न सरकारकडून सुटता सुटेना झाला आहे. त्याविरोधात येऊन आता राज्य सभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे मैदानात उतरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर छत्रपती संभाजी राजे अन्नत्याग आंदोलन करत होते आणि काल आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडलेला होता.
मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्या हातात जे आहे ते करू, मात्र…
छत्रपती संभाजी राजेंच्या तब्येतीमध्ये तिसऱ्या दिवशी बिघाड होण्यास सुरुवात झाली होती. संभाजी राजेंचा रक्तदाब काहीसा कमी होऊ लागल्याने आंदोलक संतप्त होत होते. अशा वेळी राज्य सरकारने छत्रपती संभाजी राजेंना चर्चेसाठी निमंत्रित केलं होतं. छत्रपती संभाजी राजे यांनी स्वतः चर्चेसाठी न जात मराठा समाजाच्या समन्वयकांना पाठवलं होतं. यानंतर दुपारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शिष्टमंडळाने आंदोलन स्थळी जाऊन छत्रपती संभाजी राजेंची भेट घेतली आणि त्यांच्या मुख्य पाच मागण्यांची पूर्तता केलेले कागदपत्र त्यांना दाखवले.
संयम संपला: संध्याकाळ पर्यंत पत्र आलं नाही तर…; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मागण्या कश्या पद्धतीने पूर्ण करणार याबाबत माहिती दिली. त्यानंतर मराठा समाजाच्या समन्वयकांनी या सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतर छत्रपती संभाजी राजेंनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मराठा समाजाने दाखवलेल्या संयमाबद्दल छत्रपती संभाजी राजेंनी त्यांचे आभार मानले आणि सरकारने मागण्या पूर्ण केल्याबद्दल सरकारचेही आभार मानले. यावेळी उपस्थितांनी जल्लोष साजरा केला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या अन्नत्यागाबद्दल त्यांचे आभार मानले.
Read also:
- नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी; त्या आधी समोर आली माहिती
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यांवर इडीची कारवाई; तब्बल 13 कोटी 41 लाख मालमत्ता जप्त
- नंदुरबारमध्ये दाऊद इब्राहिमच्या पुतळ्याचे दहन करत ठाकरे सरकारचा नोंदवला निषेध
- वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती, चिरंजीवला दिल्लीची स्वप्ने; भातखळकरांची टीका
- दोन विमाने आले म्हणजे सगळे विद्यार्थी आले असं होत नाही; विजयी वडेट्टीवारांचा केंद्र सरकारला टोला