नंदुरबार : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दाऊदशी संबंधित जमीन व्यवहार केल्याप्रकरणी इडीने अटक केली आहे. यावरून राज्यात एक नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीकडून राज्यभरात नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ तर विरोधी पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
नंदुरबार जिल्हाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मुख्य चौकात आंदोलने करण्यात आली. यावेळी त्यांनी दाऊद इब्राहिम यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर महाविकास आघाडी सरकारचा निषेध देखील नोंदवण्यात आला.
नारायण राणे, नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ; मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राज्यात एसटी कर्मचारी तसेच रोजगार, मजूर कष्टकरी यांचे मोठे प्रश्न असतानाही महाविकास आघाडी सरकारमधील दोषी मंत्र्यांना अटक केल्यानंतर रस्त्यावर येतात हे दुर्दैव आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरत आहे. याचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया विजय चौधरी यांनी यावेळी दिली. दाऊद इब्राहिम यांच्या संबंधीत नवाब मलिक यांनी व्यवहार केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं तापलं आहे.
Read also:
- वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती, चिरंजीवला दिल्लीची स्वप्ने; भातखळकरांची टीका
- दोन विमाने आले म्हणजे सगळे विद्यार्थी आले असं होत नाही; विजयी वडेट्टीवारांचा केंद्र सरकारला टोला
- संयम संपला: संध्याकाळ पर्यंत पत्र आलं नाही तर…; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
- मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्या हातात जे आहे ते करू, मात्र…
- भाजपने आता नवीन शिव व्याख्याते निर्माण केले का? राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया