मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामीशिवाय कोण विचारेल या वक्त्यांवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नेत्यांनी यावर प्रखर शब्दात टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सरकारने काही केले नाही, हे चुकीचे ठरेल; मराठा आरक्षणावरून संभाजी राजेंना चव्हांणाचं उत्तर
राज्यपालांच्या वक्तव्यांवर रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती. खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे, आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे, असं म्हणत त्यांनी राज्यपालांना यासंदर्भात माफी देखील मागण्यासाठी सांगितले.
राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 28, 2022
छत्रपती शिवाजी महाराजांनाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर देखील रोहित पवारांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं.
राष्ट्रवादी परिसंवाद अन् पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज!
राज्यपालांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात छत्रपती बद्दल वक्तव्य केले होते. महाराजा, चक्रवर्ती सगळे होऊन गेले, झाले. मात्र चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या जडणघडणीत आईचं मोठं योगदान असतं, तसचं आपल्या समाजात गुरुचं मोठं स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे. अशा पद्धतीचे विधान केले होते.
Read also:
- मला आता कुठपर्यंत न्यायचं हे सरकारनं ठरवावं – छत्रपती संभाजी राजे
- 4 दिवस 75 तासानंतर यशवंत जाधवांच्या घरावरील कारवाई थांबवली; महत्वाची माहिती समोर
- छत्रपती संभाजी राजेंना राज्य सरकारकडून चर्चेच निमंत्रण; मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होणार बैठक
- शिवाजी महाराज, रामदास स्वामीच्या कोणताही पुरावा नाही; राज्यपालांच्या वक्तव्यांवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- नवाब भाईंसाठी आता एमआयएम मैदानात ; खासदार इम्तियाज जलील करणार आंदोलन