मुंबई : भाजप खासदार संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यावेळी त्यांनी सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून उपोषण करण्याची वेळ असल्याचं सांगुन खंत व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी आरक्षणासाठी स्वतंत्र आयोग स्थापनेवरून त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. यावर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गली गली मैं शौर है भाजप वाले महाचोर है; रूपाली पाटलांचा भाजपवर 2500 कोटींचा आरोप
संभाजी राजे यांच्या उपोषणापुर्वी एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजासाठी स्वातंत्र्य आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर संभाजी राजे यांनी म्हटले की, एक मागासवर्ग आयोग असताना दुसरा आयोग कशासाठी स्थापन करताहेत, असा सवाल उपस्थित केला.
राष्ट्रवादीचा हरामखोर जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा? चित्रा वाघ यांनी अशोक गावडेविरोधात खोचला पदर
संभाजी राजे यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, आयोग स्थापन करण्याचा निर्णय हा कायदेशीर सल्ला घेऊनच केला घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठीच हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा मराठा समाजाला नक्कीच होणार, असंही अशोक चव्हाण म्हणाले. राज्य सरकारने शब्द फिरवला आहे, संभाजी राजे यांच्या विधानांवर अशोक चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारने कोणताही शब्द फिरवला नाही. शासनाने काहीच केले नाही हे म्हणणे चुकीचे आहे. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली.
Read also:
- भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे, तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं – शिवसेना
- संजय राठोड यांचा तात्काळ राजीनामा घेतला, राष्ट्रवादी नेत्याचा का नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- सरकारने शब्द पाळला नाही, त्यामुळेच उपोषण..; संभाजी राजेंनी व्यक्त केली खंत
- आमचा झेंडा भगवा असला तरी…; अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलील यांना टोला
- …जोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी तोपर्यंत..; अजित पवारांचा भाजपला टोला