पुणे : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रकरणावरून सध्या राज्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आंदोलने करण्यात येत आहेत तर भाजपकडून राजीनाम्याची मागणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मी पुन्हा येईन म्हणून न येणं फारचं वाईट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना पुन्हा टोमणे
महाविकास आघाडीवर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांची पाठराखण करणं म्हणजे 93च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असणाऱ्या दाऊद आणि इतर गुन्हेगाराचं समर्थन करणं. संजय राठोड यांच्या वेळी भाजपाने आंदोलन केल्यावर तात्काळ त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. जर शिवसेनेच्या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेण्यात आला तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याचा राजीनामा का घेतला नाही. याचा शिवसेनेच्या नेत्यांनी विचार करावा, असंही ते म्हणाले.
कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप धनंजय महाडिकांच्या नेतृत्वात लढणार; कोअर कमिटी बैठकीत निर्णय
मराठा, ओबीसी समाज यांना कधीही मंत्रालयासमोर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली नाही. मग नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारला आंदोलन करण्याची परवानगी कोणी दिली? याची चौकशी झाली पाहिजे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read also:
- सरकारने शब्द पाळला नाही, त्यामुळेच उपोषण..; संभाजी राजेंनी व्यक्त केली खंत
- आमचा झेंडा भगवा असला तरी…; अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलील यांना टोला
- …जोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी तोपर्यंत..; अजित पवारांचा भाजपला टोला
- राष्ट्रवादीचा हरामखोर जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा? चित्रा वाघ यांनी अशोक गावडेविरोधात खोचला पदर
- गली गली मैं शौर है भाजप वाले महाचोर है; रूपाली पाटलांचा भाजपवर 2500 कोटींचा आरोप