पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल या वक्तव्यांवर राज्यात समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे राज्यात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत एक ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट न झाल्याचा पुरावा नाही असे म्हटलं आहे.
आमचा झेंडा भगवा असला तरी…; अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलील यांना टोला
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधान खोडून काढले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही.
सरकारने शब्द पाळला नाही, त्यामुळेच उपोषण..; संभाजी राजेंनी व्यक्त केली खंत
राज्यपालांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात छत्रपती बद्दल वक्तव्य केले होते. महाराजा, चक्रवर्ती सगळे होऊन गेले, झाले. मात्र चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या जडणघडणीत आईचं मोठं योगदान असतं, तसचं आपल्या समाजात गुरुचं मोठं स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे. अशा पद्धतीचे विधान केले होते.
संजय राठोड यांचा तात्काळ राजीनामा घेतला, राष्ट्रवादी नेत्याचा का नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल
सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे शरद पवारांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात, जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं…रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते .शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी. त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती,त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली. आणि आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे,हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले.
Read also:
- नवाब भाईंसाठी आता एमआयएम मैदानात ; खासदार इम्तियाज जलील करणार आंदोलन
- राष्ट्रवादी परिसंवाद अन् पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज!
- भाजप आमदाराची जीभ घसरली; मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरतांना म्हणाले की, मी आजपर्यंत बेशर्म, नालायक…
- सरकारने काही केले नाही, हे चुकीचे ठरेल; मराठा आरक्षणावरून संभाजी राजेंना चव्हांणाचं उत्तर
- भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे, तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं – शिवसेना