औरंगाबाद : अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. मंत्री नवाब मलिक झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्ष हे आंदोलनात उतरले आहेत. आता या आंदोलनाला एका विरोधी पक्षाची देखील साथ मिळणार आहे.
आमचा झेंडा भगवा असला तरी…; अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलील यांना टोला
मुस्लिमांना दहशतवादी म्हणून त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली जाते, असा आरोप करत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावर उतरण्याची घोषणा औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली. औरंगाबादेत बोलतांना इम्तियाज यांनी ही भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सरकारने शब्द पाळला नाही, त्यामुळेच उपोषण..; संभाजी राजेंनी व्यक्त केली खंत
महाविकास आघाडीतील अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे. या दोन्ही प्रकरणावर कालचं इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना जलील यांनी म्हटलं आहे की नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतील त्याच्याशी आमचे काही देणे घेणे नाही. मात्र केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मुस्लिम समाजाला नेहमी दहशतावादाशी जोडून बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो आहे. वारंवार मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. त्यांचा संबंध दहशतवादाशी जोडला जात असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा संतप्त इशाराही जलील यांनी दिला आहे.
Read also:
- राष्ट्रवादी परिसंवाद अन् पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज!
- भाजप आमदाराची जीभ घसरली; मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरतांना म्हणाले की, मी आजपर्यंत बेशर्म, नालायक…
- सरकारने काही केले नाही, हे चुकीचे ठरेल; मराठा आरक्षणावरून संभाजी राजेंना चव्हांणाचं उत्तर
- भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे, तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं – शिवसेना
- संजय राठोड यांचा तात्काळ राजीनामा घेतला, राष्ट्रवादी नेत्याचा का नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल