पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कारभारी अजित पवार यांचे होम पीच असलेल्या पिंपरी-चिंचवडसह खेड व मावळमध्येही ‘संवाद’पार पडला. पक्षाच्या केंद्रबिंदूशी संवाद… अशी संकल्पना असलेल्या या मेळाव्याला खेड, मावळ आणि पिंपरी-चिंचवडची तुलना करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची पाळेमुळे रुजली आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्त्व पिंपरी-चिंचवडमध्येच खऱ्या अर्थाने विकसित झाले. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून २०१७ पर्यंत एकहाती सत्ता असलेल्या शहरात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशीच ओळख. मात्र, हा बालेकिल्ला २०१७ मध्ये ढासळला. त्यातून बोध घेत. राष्ट्रवादीने संघटनात्मक आणि राष्ट्रवादी विचार तळागाळात पोहोचवणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही.
यशोमती ठाकुर यांचं मंत्रीपद डोक्यावरून गेलंय, उपचाराची गरज; नवनीत राणांचा टोला
खेड, मावळ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या परिवार संवाद कार्यक्रमाची तुलना करता पिंपरी-चिंचवड आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे अपयश उठून दिसले. खेड आणि मावळमध्ये आमदार दिलीप मोहिते आणि आमदार सुनील शेळके यांनी रेकॉर्ड ब्रेक गदी करुन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दाद मिळवली. मावळ तसे पाहता भाजपाचा बालेकिल्ला होता. माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सलग दोनदा विधानसभा गाजवली. २५वर्षे भाजपाचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात सुनील शेळके यांच्यासारख्या युवा नेतृत्त्वाने आपली छाप निर्माण केली, तीही राष्ट्रवादीच्या तिकीटावर… ही बाब राष्ट्रवादीसाठी दिलासादायकच म्हणावी लागेल.
राष्ट्रवादीचा हरामखोर जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा? चित्रा वाघ यांनी अशोक गावडेविरोधात खोचला पदर
पूर्वाश्रमीचे भाजपातील सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर २०१९ मध्ये बाजी मारली. मात्र, आता मावळातील चित्र बदलले आहे. परिवार संवाद मेळाव्याचे रुपांतर अक्षरश: सभेत झाले. जयंत पाटीलही भारावून गेलेखेडमधील परिस्थिती तशी दिसली. एकेकाळी . शिवसेनेचे माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांची सत्ता असलेल्या खेड तालुक्यात मोहिते यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाची टीकटीक सुरू केली. जयंत पाटलांच्या उपस्थित झालेला मेळावा शिवसेना, भाजपाच्या मनात धडकी भरवणारा ठरला.
…जोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी तोपर्यंत..; अजित पवारांचा भाजपला टोला
पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र चित्र उलटे दिसले. दिलेल्या जबाबदारीचे चीज करण्यात अजित गव्हाणे सपशेल फेल ठरताना दिसतात. शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गव्हाणे यांनी स्टंटबाजी करण्यासाठी भाडोत्री लोकांचा भरणा करुन महापालिकेवर मोर्चा नेला. त्यानंतर महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकत्र घेवून गव्हाणे यांनी आंदोलनाचा प्रयोग केला. तीन पक्षांतील आंदोलकांची संख्या पाहता भाजपाची झोप उडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तिथेही भ्रमनिरास झाला. त्यानंतर परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करणे अपेक्षीत आहे.
मात्र, तसे झाले नाही. भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नगरसेवक वसंत बोराटे यांच्या समर्थकांनी मोशी झालेल्या कार्यक्रमाला गर्दी केली. अन्य ठिकाणी गव्हाणे यांच्या मागे-पुढे करणाऱ्यांची संख्या दिसत होती. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही गव्हाणे यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे खासगीत सांगितले जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाला महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी उपस्थिती दर्शवली नाहीत. तसेच, अजित पवार आणि पार्थ पवार यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली असती, तर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले असते. पण, जयंत पाटील यांना एकट्याला खिंड लढवावी लागली.
आमचा झेंडा भगवा असला तरी…; अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलील यांना टोला
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही माजी महापौर योगेश बहल यांच्या रिमोटवर चालणारे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी झाली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद… पक्षाच्या केंद्रबिंदूशी संवाद… असा हा परिवार संवाद नव्हता. शहरातील एकूण ४६ प्रभागातील १३९ जागांसाठी प्रत्येक १०ते १५ जण इच्छुक मेळाव्यात सहभागी झाले असते आणि पदाधिकारी कायकर्ते आले असते, तर कदाचित दोन हजार लोक जमले असते. मात्र, संवाद मेळाव्याच्या व्यासपीठावर केवळ पदाधिकारी आणि चमकोगिरी करणाऱ्यांचा भरणा केला होता. याचा अर्थ राष्ट्रवादी प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला असून, योगेश बहल आणि अजित गव्हाणे पक्षाला पराभवाच्या खाईत ढकलतआहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यातील नेत्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये आता आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे, असा संताप राष्ट्रवादीच्या एका निष्ठावंत पदाधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केला आहे.
Read also:
- भाजप आमदाराची जीभ घसरली; मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरतांना म्हणाले की, मी आजपर्यंत बेशर्म, नालायक…
- सरकारने काही केले नाही, हे चुकीचे ठरेल; मराठा आरक्षणावरून संभाजी राजेंना चव्हांणाचं उत्तर
- भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे, तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं – शिवसेना
- संजय राठोड यांचा तात्काळ राजीनामा घेतला, राष्ट्रवादी नेत्याचा का नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- सरकारने शब्द पाळला नाही, त्यामुळेच उपोषण..; संभाजी राजेंनी व्यक्त केली खंत