अमरावती : खासदार नवनीत राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यातील राजकीय वैर सगळ्यांना आता माहिती झालं आहे. याअगोदर यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरून बराच वाद झालेला दिसला. अशातच आता नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर शेलक्या शब्दात टोला हाणला आहे.
राष्ट्रवादीचा हरामखोर जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा? चित्रा वाघ यांनी अशोक गावडेविरोधात खोचला पदर
शहरातील विविध घटनांवरून टिका करताना नवनीत राणा म्हणाल्या की, यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद डोक्याच्या वर गेलं आहे. त्यामुळं माझी काळजी म्हणून व मोठी बहीण म्हणजे एक सल्ला आहे. त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे जाऊन मनोरुग्णांचे उपचार करून घ्यावे. कारण आणखी अडीच वर्षे बाकी आहेत. त्यामुळं लगेच आपल्या डोक्याचा उपचार करून घ्यावा. तसेच तर चुकीच्या पद्धतीने मंत्रीपद त्यांच्याकडे गेलं. आता त्यांना सहन होत नाही, असा टोला नवनीत राणा यांनी यावेळी लगावला.
…जोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी तोपर्यंत..; अजित पवारांचा भाजपला टोला
त्या पुढे म्हणाल्या की, सामान्य माणसांसोबत निदान चटणी भाकर खाल्ली तरी ते दुसऱ्याला मदत करतात. मी सामान्य लोकांसोबत असल्यानं त्यांनी मला खासदार बनविले आहे. ज्याचा लेकरु त्यांनीच बारसा करावं, असं वरिष्ठ संजू देशमुख म्हणतात. ते खूप सिनीअर आहेत. काही गोष्टी डोक्याच्या वर जातात. ज्यांनी भूमिपूजन केलं त्यांना ते पद डायजेस्ट होत नाही. पालकमंत्र्यांचं पद डोक्याच्या वर चाललंय. मोठी बहीण म्हणून एक सजेशन आहे.
आमचा झेंडा भगवा असला तरी…; अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलील यांना टोला
पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि राणा कुटुंबीयात सध्या जोरदार राजकीय वाद सुरू आहे. अनेकदा त्यांच्याकडून आरोपाच्या फैरी एकमेकांनावर झाडल्या जातात. त्यामुळे नवनीत राणा यांच्या वक्तव्याला यशोमती ठाकूर काय प्रत्युत्तर देतात. ते पहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Read also:
- भाजप आमदाराची जीभ घसरली; मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरतांना म्हणाले की, मी आजपर्यंत बेशर्म, नालायक…
- सरकारने काही केले नाही, हे चुकीचे ठरेल; मराठा आरक्षणावरून संभाजी राजेंना चव्हांणाचं उत्तर
- भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे, तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं – शिवसेना
- संजय राठोड यांचा तात्काळ राजीनामा घेतला, राष्ट्रवादी नेत्याचा का नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- सरकारने शब्द पाळला नाही, त्यामुळेच उपोषण..; संभाजी राजेंनी व्यक्त केली खंत