मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यांवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. खासदार संजय राऊत यासंदर्भात म्हणाले की, भाजपने आता नवीन शिव व्याख्याते निर्माण केले आहेत. छत्रपतींबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य कुणा एखाद्या व्यक्तीने केले असते तर भाजपने रस्त्यावर उतरून गोंधळ घातला असता. यासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यामुळे त्यांच्याच राज्यपालांनी अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यामुळे राज्यात संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी परिसंवाद अन् पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज!
युक्रेन मध्ये भारतीय मुलांच्या सुरक्षासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, जगात इराकपासून ते अफगाणिस्तान पर्यंत अनेक प्रकाराची युद्ध झालीत. आतापर्यंत अशा प्रकारे हिंदुस्तानी समाजावर अत्याचार झाले नव्हते. त्याला मी देशाला दोष नाही. रशियाने लादलेले युद्ध आहे त्यात आपली तटस्थ असल्याची भूमिका घेतली आहे.
नवाब भाईंसाठी आता एमआयएम मैदानात ; खासदार इम्तियाज जलील करणार आंदोलन
परदेशातून अशा प्रकारे अनेक विद्यार्थी आणले आहेत. परदेशातून १०० ते १५० विद्यार्थी घेऊन आँपरेशन गंगा म्हणून जाहिरात करताहेत. हे सरकारचे अपयश आहे. हे सगळं निवडणुकांसाठी आहे. पंजाब मध्ये अजून मतदान बाकी असतं तर तिकडच्या धार्मिक स्थळाचं नाव घेऊन आँपरेशन केले असते. तसेच महाराष्ट्रात सह्याद्री शब्दाचा वापर झाला असता. गुजरात मध्ये सोमनाथच्या नावाने केले असते हे फक्त निवडणुकीपुरतं आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितले.
देशातील मुलं संकटात असताना देशाच्या प्रचार प्रसाराला केले जात आहे. याला मी राष्ट्रीयपणा म्हणणार नाही. अनेक देशातील मुलं त्या देशात अडकले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी सरकारने अथवा विरोधी पक्षांनी कोणतंही भांडवल करू नये, असंही संजय राऊत म्हणाले.
Read also:
- नारायण राणे, नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ; मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर रोहित पवारांचे ते ट्विट चर्चेत; म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकही…
- मला आता कुठपर्यंत न्यायचं हे सरकारनं ठरवावं – छत्रपती संभाजी राजे
- 4 दिवस 75 तासानंतर यशवंत जाधवांच्या घरावरील कारवाई थांबवली; महत्वाची माहिती समोर
- छत्रपती संभाजी राजेंना राज्य सरकारकडून चर्चेच निमंत्रण; मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होणार बैठक