मुंबई : भाजप खासदार संभाजी राजे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सात मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. दोन दिवस उलटून गेले तरी याबाबत काहीही तोडगा निघाला नाही. मराठा क्रांती ठोक मोर्चा देखील आता संभाजी राजे यांना पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरला आहे. मात्र संभाजी राजे यांची आता तब्येत बिघडली असून मराठा क्रांती ठोक मोर्चाने आक्रमक भूमिका घेतला आहे.
खासदार संभाजी राजे यांनी उपस्थितीत केलेल्या सात मागण्यांसाठी सरकारसोबत चर्चा करण्याची आता वेळ नाही. यासंदर्भात सरकारने थेट पत्र घेऊन आझाद मैदानावर यावं. आमचा संयम आता संपला आहे. तीनचाकी सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो. जर संध्याकाळ पर्यंत हे पत्र आलं नाही तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बंगल्यात घुसु असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.
4 दिवस 75 तासानंतर यशवंत जाधवांच्या घरावरील कारवाई थांबवली; महत्वाची माहिती समोर
संभाजी राजे यांनी मांडलेल्या मागण्या तात्काळ मान्य झाल्या पाहिजे. या मागण्यांसाठी या अगोदर सरकार सोबत चर्चा झाली होती. सरकारने तेव्हा मात्र सकारात्मक भूमिका घेतली होती. आता फक्त अंमलबजावणी करायची बाकी आहे. यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, असं मराठा क्रांती ठोक मोर्चेचे समन्वयक आबासाहेब पाटील आणि रमेश खैरे-पाटील यांनी सांगितले. आझाद मैदानावर संभाजी राजे यांना भेटण्यासाठी अनेक नेते आले. परंतु अद्यापही यावर काही तोडगा काढला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी राजे यांना यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलवलं आहे. मात्र संभाजी राजे यांची आता अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे यावर पुढे काय घडणार आहे. यावर सगळ्याचं लक्ष आहे.
Read also:
- मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्या हातात जे आहे ते करू, मात्र…
- भाजपने आता नवीन शिव व्याख्याते निर्माण केले का? राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया
- नारायण राणे, नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ; मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर रोहित पवारांचे ते ट्विट चर्चेत; म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकही…
- मला आता कुठपर्यंत न्यायचं हे सरकारनं ठरवावं – छत्रपती संभाजी राजे