मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 2024 नंतर पुन्हा दिल्लीत बसणार असल्याचे पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. यावरून त्यांच्यावर भाजपचे नेते जोरदार टोलेबाजी करीत आहेत. यावर आता भाजपचेच नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.
मला आता कुठपर्यंत न्यायचं हे सरकारनं ठरवावं – छत्रपती संभाजी राजे
आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यांवर एक ट्विट केले आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतेय, चिरंजीव दिल्लीची स्वप्न पडतायत. महाराष्ट्रात यांचे ५६ आमदार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद निर्माण होण्याची आता शक्यता आहे.
गजानन किर्तीकर म्हणाले की होते की, मुंबईचं महत्त्व आता दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. सगळं दिल्लीला नेण्याचं डाव आहे. पण 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मी दिल्लीत बोललो ते उत्तर प्रदेश मध्ये देखील बोललो आहे. इथेही तेच सांगत आहे. महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलविण्याचे डाव सुरू आहेत. पण 2024ला शिवसेना तिथे बसेल आणि सगळं थांबवेल. शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल. केंद्रीय एजन्सीचं जे काम सुरू आहे, ते केवळ प्रचारासाठीच सुरू आहे.प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढेल. भूमिपुत्रांना न्याय देई, असंही आदित्य यांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेश मध्ये प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या सोबत खासदार संजय राऊत हे देखील होते.
Read also:
- दोन विमाने आले म्हणजे सगळे विद्यार्थी आले असं होत नाही; विजयी वडेट्टीवारांचा केंद्र सरकारला टोला
- संयम संपला: संध्याकाळ पर्यंत पत्र आलं नाही तर…; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
- मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्या हातात जे आहे ते करू, मात्र…
- भाजपने आता नवीन शिव व्याख्याते निर्माण केले का? राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया
- नारायण राणे, नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ; मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल