मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले होते . महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्ष हे आंदोलनात उतरले आणि आता या आंदोलनाला एका विरोधी पक्षाची देखील साथ मिळाली ती म्हणजे एमआयएमची.
वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती, चिरंजीवला दिल्लीची स्वप्ने; भातखळकरांची टीका
आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. २३ मार्चला तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली असून त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक हे कोठडीत ज्या आक्रमकतेने ईडीच्या, केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात बोलत होते, आता आक्रमकपणा कोठडीतूनही समोर आला आहे.
नंदुरबारमध्ये दाऊद इब्राहिमच्या पुतळ्याचे दहन करत ठाकरे सरकारचा नोंदवला निषेध
कारण नवाब मलिक हे आता केंद्रीय तपास यंत्रणा असणाऱ्या ईडीच्या विरोधात थेट कायदेशीर लढा लढणार आहेत. ईडीने मलिकांच्या विरोधात केलेल्या कारवाईबद्दल दाखल केलेला खटला हा आणि केलेली अटक बेकायदेशीर असून, हा खटला रद्द करण्यात यावा आणि आपल्याला या आरोपांमधून ताबडतोब मुक्त करण्यात यावं, अशी मागणी करत नवाब मलिक यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यांवर इडीची कारवाई; तब्बल 13 कोटी 41 लाख मालमत्ता जप्त
याशिवाय जी काही कारवाई सध्या सुरु आहे ती अत्यंत सूडबुद्धीने होणारी कारवाई आहे असं देखील यामध्ये म्हटलं आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि आम्ही जे सातत्याने बोलत आहे त्यामुळे सध्या कारवाईचा सूड उगवण्याचा प्रकार सध्या सुरु आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही जो असत्याचा पर्दाफाश करण्यात येत आहे, मुखवटे काढले जात आहेत, त्यांच्या मागे देशभरामध्ये ईडी, सीबीआय लावले जात आहेत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read also:
- आता जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम करायचा; खासदार विखेंचा महाविकास आघाडीला इशारा
- संजय राऊत अजून एक राजकीय बॉम्ब फोडण्याच्या तयारीत; लवकरच पत्रकार परिषद घेणार
- लक्ष नाय काय म्हणता, या माणसाला टीका करण्याखेरीज काम नाही – नारायण राणे
- मराठा समाजाच्या प्रमुख पाच मागण्या सरकार पूर्ण करणार; संभाजीराजेंच्या कोणत्या मागण्या होत्या…
- नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी; त्या आधी समोर आली माहिती