नाशिक : रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्धस्थिती परीस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेन मध्ये अडकलेले परदेशी नागरिक आता बाहेर पडण्यासाठी धडपड करीत आहेत. भारताने देखील आँपरेशन गंगा द्वारे युक्रेन मधून काही विद्यार्थ्यांना भारतात आणलं आहे. तसेच केंद्र सरकारने यासाठी चार मंत्र्यांची नेमणूक केली आहे. यावरून अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत अजून एक राजकीय बॉम्ब फोडण्याच्या तयारीत; लवकरच पत्रकार परिषद घेणार
रशिया युक्रेनमध्ये सध्या भयंकर युद्ध सुरू आहे. त्यानंतर आता चार मंत्री युक्रेनमध्ये पाठवून राजकीय इव्हेंट करण्याचा प्रकार केंद्र सरकार करीत आहेत. अमेरिका देशाने ज्या प्रकारे नागरिकांना अगोदरच बोलवून घेतलं होतं. तसंच आपणही युद्ध सुरू होण्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांना बोलवून घेणं गरजेचे होते. अशी टीकाही भुजबळ यांनी केंद्र सरकारवर केली.
आता जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम करायचा; खासदार विखेंचा महाविकास आघाडीला इशारा
आता 4 मंत्री युक्रेन मध्ये पाठवून राजकीय इव्हेंट केला जात आहे. याला काही अर्थ नाही. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आणि मते मिळवायची अशा पद्धतीचे भाजपचं राजकारण सुरू आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. ऑपरेशन गंगा द्वारे 900 विद्यार्थ्यांना भारतात सुखरूप आणलं आहे. अजूनही 2500 ते 3000 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकून पडले आहेत.
Read also:
- ईडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे ? सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल
- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून; नवाब मलिकांचा मुद्दा अधिवेशनात गाजणार?
- अन्य दोन पक्ष वाया गेले, आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंकडे – आशिष शेलार
- संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयात जमा केले पुरावे; कारवाईची मागणी
- ईडीच्या कारवाईच्या विरोधात नवाब मलिक आक्रमक; मुंबई उच्च न्यायालयात मागितली दाद