मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरु होणार आहे. येत्या 25 मार्च पर्यंत हे अधिवेशनाचे कामकाज सुरू राहणार आहे. अर्थसंकल्पी अधिवेशन नागपूरला घेण्याच्या ठरलं होतं. मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे नागपूरला अधिवेशन घेणे शक्य नसल्याने यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेण्यात यावे असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
लक्ष नाय काय म्हणता, या माणसाला टीका करण्याखेरीज काम नाही – नारायण राणे
अर्थसंकल्पीय अधिवेशनात 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार सादर करतील. दरम्यान या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी ही वेगवेगळ्या मुद्यांवर एकमेकांची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. सध्या राज्यात नवाब मलिक प्रकरण, ओबीसी आरक्षण याबाबत विरोधकांकडून आरोप- प्रत्यारोप चालू आहेत. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना खालील विषयावर घेरण्याची शक्यता आहे.
– नवाब मलिक यांचा राजीनामा.
– ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण बाबत सरकारची दिरंगाई.
– आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचारचे आरोप.
– शेतकऱ्यांची वीजबील माफी.
– पीक विमा
– कोविड काळातील भ्रष्टाचार
– केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर
– मोदींनी लोकसभेत महाराष्ट्र बाबत केलेलं वक्तव्य
– पेगसेस प्रकरण
वरील प्रमुख मुद्द्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
Read also:
- अन्य दोन पक्ष वाया गेले, आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंकडे – आशिष शेलार
- संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयात जमा केले पुरावे; कारवाईची मागणी
- ईडीच्या कारवाईच्या विरोधात नवाब मलिक आक्रमक; मुंबई उच्च न्यायालयात मागितली दाद
- आता जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम करायचा; खासदार विखेंचा महाविकास आघाडीला इशारा
- संजय राऊत अजून एक राजकीय बॉम्ब फोडण्याच्या तयारीत; लवकरच पत्रकार परिषद घेणार