मुंबई : संविधानाचा जो ढाचा आहे, त्या संविधानातून निर्माण झालेली ही पदं आहेत. या संविधानातील एका शब्दाचा आधार घेत पत्र लिहायचं आणि त्या शब्दाला विरोध असल्याचं दाखवायचं. ‘त्या’ शब्दाला विरोध म्हणजे पूर्ण संविधानालाच विरोध करण्यासारखं आहे, असं गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून मोठा गदारोळ झाला होता.
त्यावरून सत्ताधारी पक्षानं राज्यपालांना चांगलेच धारेवर धरले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीही त्या पत्रावरून राज्यपालांबाबत नाराजी व्यक्त करत त्यांना घरचा आहेर दिला आहे. आता गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा राज्यपालांच्या पत्रावर टीकास्र सोडलं आहे.
बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्वांना एकत्र ठेवते. त्यात असा शब्दच्छल करणं चुकीचं होतं. आज जे काही अमित शाह बोलले ते योग्यच आहे. राष्ट्रपती किंवा राज्यपाल संविधानाचे रक्षणकर्ते आहेत, त्यांनी असं अचानकपणे म्हणणे धक्कादायक आणि घटना विरोधी होते. ज्यांना ज्यांना संविधान समजते, त्यांना राज्यपालांचं हे पत्र पटलेले नसल्याचंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे.
पूर परिस्थितीची पाहणी करत असतील, तर हे योग्यच आहे, कारण ते मुख्यमंत्र्यांच कामच आहे. कुणाला काहीही म्हणायची संविधानाने नारायण राणेंना मुभा दिली आहे, त्यामुळे कुणाला त्यांनी काही ही म्हणावं त्यात आक्षेप असण्याचं कारण नसल्याचंही आव्हाड म्हणाले.
तसेच शरद पवार नुकसानाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. त्यावर आव्हाड म्हणतात, शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेला एक वर्ष झालं. शरद पवारांचा उभा जन्म हा जनसेवेसाठीच झालेला आहे. सभेदरम्यान जोरदार पाऊस पडला आणि साहेबांनी छत्री न घेता सभेला संबोधित केलं. आणि त्या दिवशी सर्व राजकीय दिशा बदलल्या.
आज परत लोकांचे अश्रू पुसण्यासाठी ते बांधावर गेले आहेत. माझ्या लोकांच्या डोळ्यात अश्रू असताना कोणताही धोका असला तरी तिथे बांधावर जाण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे. वय 80 वर्षं आहे. शरद पवार आणि आव्हान एक मिळत जुळत नातं असल्याचंही जितेंद्र आव्हाडांनी अधोरेखित केलं आहे. विरोधी पक्षाचा दौरा हा उपयोगी पडत असतो, काही उपयुक्त माहितीही मिळत असते.
Read Also :
बिहार निवडणुकीत पंतप्रधान मोदी प्रमुख चेहरा असल्यास फायदा काँग्रेसचाच : संजय निरुपमhttps://t.co/2cdQVeO6oC
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 18, 2020