नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडू बसले आहेत. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, सरकारशी अनेकदा चर्चा करूनही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत.
देशविरोधी शक्तींचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचा, दावा भाजपकडून सातत्याने केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘या आंदोलनात एकही शेतकरी नाही, तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करत आहे?’, असा खोचक सवाल काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री पी चिदंबरम यांनी सरकारला केला आहे.
यदि आप इन सभी श्रेणियों से थक चुके हैं, तो इसका मतलब है कि हजारों प्रदर्शनकारियों के बीच कोई किसान नहीं हैं!
अगर किसान नहीं हैं, तो सरकार उनसे बात क्यों कर रही है?— P. Chidambaram (@PChidambaram_IN) December 13, 2020
पी चिदंबरम म्हणाले की, सत्ताधारी मंत्र्यांनी शेती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना खलिस्तानी, पाकिस्तान आणि चीनचे एजंट, नक्षलवादी म्हटलं आहे. हल्ली तर त्यांचा उल्लेख हे मंत्री तुकडे तुकडे गँगमधील सदस्य असाही करताना दिसत आहेत.
तुम्ही असे आरोप करत आहात तर याचा अर्थ या हजारो आंदोलनकर्त्यांमध्ये एकही शेतकरी नाही. जर या आंदोलनात एकही शेतकरी नाही, तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करत आहे?, असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.