आज सावरगाव घाट येथे आयोजित दसरा मेळाळ्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, परंतु हे पॅकेज पुरेसं नाही. मुख्यमंत्र्यांनी अजून थोडी उदारता दाखवावी, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
या दहा हजार कोटीच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, अशी टीकाही भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केली आहे. या पॅकेजने शेतकरी, ऊसतोड कामगारांची दिवाळी कशी गोड होणार? असा सवाल करतानाच सरकारला हे पॅकेज वाढवण्याची मागणी करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांचे अत्यंत हाल झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावे लागेल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
कुणीतरी म्हटलं उसतोड कामगारांचे निर्णय मुंबईत बसून होत नाही. उसतोड कामगारांचे निर्णय धाब्यावर बसून होतात का? उसतोड कामगारांचे निर्णय घेण्यासाठी फडातच जावे लागत असे नाही.ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या 10 हजार कोटींचं पंकजा मुंडेंनी टीका केली. शेतकऱ्यांना भरघोस मदतीची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.