मुंबई : मंत्रिमंडळाने ३२ साखर कारखान्यांची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र या कारखान्याच्या थकबाकी मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. मात्र यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला आहे.
याचे कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा पलटवार पंकजा मुंडेंनी केला आहे. वैद्यनाथ साखर कारखान्याला थकहमी मिळण्यासाठी धनंजय मुंडे यांनी विरोध न करता राजकारण बाजूला ठेवून आग्रही मागणी केली असा दावा स्वतः धनंजय मुंडे यांनी केला आहे. तर पंकजा मुंडे यांनी हा दावा खोडून काढत आपल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याचं म्हटलं आहे, यासंदर्भात एका वृत्तपत्राने माहिती दिली आहे.
पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 10 कोटी 77 लाख रूपयांची थकहमी राज्य सरकारने मंजूर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु असल्याचे दिसत आहे.
Read Also :
एनसीबी ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का?-काँग्रेसचा सवालhttps://t.co/TVmZIFfCcX
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020