राज्यातील कुठल्याही मुकादमानं आणि ऊसतोड कामगारांनी आपलं बिऱ्हाड बांधू नये, ऊसतोड कामगारांनी उग्र स्वरूप धारण केल्यास ते कोणत्या टोकाला पोहोचतील हे सांगता येणार नाही, असं भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले होते. त्यावर आता भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते काय ऊसतोड कामगारांना धमकी देत आहेत काय?, हा संप आतापर्यंत लोकांच्या स्वयंस्फूर्तीनं होत होता. धमक्या देऊन आणि भाड्याची लोक आणून हा संप होत नव्हता. हे असं चालणार नाही, असा इशाराच पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना दिला आहे.
दरम्यान, कुणीतरी म्हटलं उसतोड कामगारांचे निर्णय मुंबईत बसून होत नाही. उसतोड कामगारांचे निर्णय धाब्यावर बसून होतात का? उसतोड कामगारांचे निर्णय घेण्यासाठी फडातच जावे लागत असे नाही. ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या 10 हजार कोटींचं पंकजा मुंडेंनी टीका केली. शेतकऱ्यांना भरघोस मदतीची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.