बुलढाणा : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सध्या राज्य सरकारला एसआयटी स्थापन करण्याची खाज सुटली आहे. त्यांनी अगोदर खोक्केवाल्यांवर चौकशी करावी असं राऊतांनी मागणी केली होती. त्यावर आता बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी टीव्ही9 च्या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राऊतांनावर निशाणा साधला आहे.
“मोदीजी हेच का अच्छे दिन..!” 2021 मध्ये तब्बल 42, 004 मजुरांच्या आत्महत्या
संजय गायकवाड म्हणाले की, त्यांच्या नेत्यांची अकार्यक्षमता आणि वात्रट तोंड यांच्यामुळे कंटाळून आमदारांनी उठाव केला, अन् हे आमदार फुटले. कुठल्याच प्रकराची कामं होत नव्हती. आमदारांनी कुठेच प्रवेश नव्हता. मातोश्रीची दारं बंद होती. घरूनच काम केल जात होतं. त्यामुळे दोन वर्ष होऊन गेले, त्यावरून लोकांना उत्तर काय देणार. तसेच शिंदे साहेबांवर अन्याय सुरू होता. त्यामुळे सगळे आमदार शिंदे साहेबांच्या पाठीशी आले अन् ही भूमिका घेतली. त्यामुळे संजय राऊतांनी कितीही वात्रटपणा केला तरी लोकांच्या पचनी ते पडणार नाही.
आदित्य ठाकरेनंतर आता उद्धव ठाकरेंवरही चौकशीची टांगती तलवार, उमेश कोल्हे हत्या प्रकरणी चौकशी होणार
11 कॅबिनेट मंत्री सत्तेवर लाथ घालून जातात, तर याला फुटला, गद्दार कसं काय म्हणायचं. मंत्रीपदासाठी लोक हजारो, कोटी देण्यास तयार असतात. ते सोडून 50 खोक्यांसाठी जाणार म्हणता. आता संजय राऊतांना तेवढा तर अक्कल पाहिजे. त्यामुळे संजय राऊतांच्या या वक्तव्याला कुणीही भीक घालत नाही. अन् येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी लोकांमधून येऊन निवडून दाखवावंं, असं आवाहन देखील त्यांनी दिलं आहे.
“संजय राऊतांच्या वात्रट तोंडामुळे आमदारांनी राज्यात उठाव केला”
दरम्यान, राज्याच्या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आमदारांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी लावून धरली होती. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मागणी मान्य करत त्यावर एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. या प्रकरणावरून शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यावरून आता शिवसेनेकडून राज्य सरकारवर कडाडून टिका केली जात आहे.
Read also
- जंयत पाटलांचं निलंबण..! पुतणे अजित पवार यांच्यावर काका शरद पवार नाराज?
- “तर फडणवीस उपमुख्यमंत्री पदावरही राहणार नाहीत”; फडणवीसांना भाजपचाच आहेर
- “A फॉर अमित शाह सुद्धा होतं,” विकृतीचं नाव ठेवणाऱ्या राणेंना जोरदार प्रत्युत्तर
- “यंत्रणा आता कुणाला काही सोडत नाय”, संजय शिरसाठांचा ठाकरे गटाला इशारा
- “राजकारणाचं काय खरं नाय”, वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट जोरदार चर्चेत