पुणे : नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरो च्या नवीन आकडेवारीनुसार धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. भारतात शेतकरी आणि मजूरांच्या आत्महत्यांचं प्रमाण यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ही संख्या 2018 च्या आकडेवारीपेक्षा 6 टक्के जास्त आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये थोडीशी घट झाली आहे. परंतु मजुरांच्या आत्महत्यांमध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टिका केली आहे.
“या प्रकरणी अमृताताईंनी निष्क्रिय गृहमंत्री फडणवीसांच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी”
2014 ते 2021 या कालावधीत रोजंदारी कामगारांच्या आत्महत्येचे प्रमाण जवळपास तिपटीने वाढले आहे. गृहमंत्रालायच्या म्हणण्यानुसार, जिथे 2014 मध्ये 15,735 रोजंदारी मजुरांनी आत्महत्या केल्या होत्या. त्याच 2021 मध्ये हा आकडा 42, 004 पर्यंत वाढला आहे. मोदीजी हेच का अच्छे दिन असं म्हणत रवीकांत वरपे यांनी मोदींवर टिका केली आहे.
“दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही निघत नाही”
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेतील रिअर इस्टेट क्षेत्रात मंदी आली आहे. हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख जीडीपी चालकांपैकी एक आहे. नोटाबंदीमुळे हे क्षेत्र काळ्या पैशाच्या व्यवहारांपासून स्वच्छ केले आहे. यात काही शंका नाही. पण त्याच वेळी या क्षेत्रातील खरेदी विक्रीने अक्षरश: तळ गाठला आहे. बांधकामासाठी आवश्यक उत्पादनांच्या विक्रिला मोठा फटका बसला आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“गेली चार दिवस मी सभागृहात घसा फुटेपर्यंत ओरडतोय, पण..;” आव्हाडांची नाराजी
तसेच रोजगारांच्या संधी कमी झाल्या आहेत. या क्षेत्रात पुनरूज्जीवनाची आशा धूसर आणि दुर्गम आहे. रिअल इस्टेट क्षेत्राची स्तब्धता ही भारतीय अर्थव्वस्थेच्या एकूण सुधारणा प्रक्रियेत एक गंभीर अडथळा ठरणार आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- आदित्य ठाकरेनंतर आता उद्धव ठाकरेंवरही चौकशीची टांगती तलवार, उमेश कोल्हे हत्या प्रकरणी चौकशी होणार
- “संजय राऊतांच्या वात्रट तोंडामुळे आमदारांनी राज्यात उठाव केला”
- “सरकारला SIT स्थापन करण्याची खाज, अगोदर खोक्केवाल्यांची चौकशी करा”, संजय राऊत
- “भाजप आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात..! 50 फुट गाडी दरीत कोसळली”
- “पोटातलं ओठावर आलंच, मनसेने शेअर केला तो सेना अन् राष्ट्रवादीचा व्हिडीओ